कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या
मनात एखाद्या व्यक्तीबाबत
चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा,
आपण स्वतः चार पावले चालुन
समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद
साधुन मगच खात्री करा.
99 टक्के सांगणारा उघडा पडल्याशिवाय राहणार नाही.आपल्याला कोण काय माहिती सांगतो,त्याचा हेतू काय आहे,यावरून त्याचा कावा ओळखता येऊ शकतो
आपल्यात फाटाफूट करून तो आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करत असतो,आपल्यात फूट पाडून त्याचा फायदा असल्याशिवाय तो कशाला आपल्या विषयी एखाद्याच्या मनात विष पेरेल?
जगातील अनेक संबंध असेच स्वार्थी लोकांनी आपल्या स्वार्थापायी तोडले आहेत.
जरा आजूबाजूला पाहिले की असे लोक खूप दिसतील.
आणि माणसाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीवर लवकर विश्वास बसतो.याचाच फायदा फाटाफूट करणारे लोक घेत असतात.
म्हणून फाटाफूट करणाऱ्या लोकांपासून वेळीच सावध व्हा.आणि आपले संबंध टिकवा.
संबंध तुटल्यानंतर सत्य कळले तर त्याचा काही फायदा होत नाही.तुटलेली मने जुळायला खूप वेळ लागतो .मने जुळली तरी ती दुरावा ठेवूनच असतात.हे सत्य आहे.
तेंव्हा वेळीच सावध होऊन आपले संबंध टिकवा.

Marathi Quotes by Hari Alhat : 111736676

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now