सहज सुचलेले
आयुष्यात खूपदा आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागते. अश्या वेळी नशिबाला दोष देत बसू नका. नशीब अशी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये. जे काही आहे, ते आहे आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम, आणि हे आपल्याला स्वीकारावेच लागेल. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्या, आणि झालेल्या चुका उगाळत न बसता, पुढे चालत रहा, आयुष्य जगत रहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अश्या वेळी "पक पक पकाक" सिनेमा मधील एक सुंदर वाक्य सांगावेसे वाटते, "आयुष्य खूप सुंदर आहे मित्रानो, त्याला आणखी सुंदर बनवूया".