बायकांचा आवरणं...
बायकांना नटायची फारच आवड...त्यांच्यासमोर खुद्द यमराज जरी समोर उभा ठाकला तरी बायका बदलतील अशी आशा म्हणजे निव्वळ वेडेपणाच....
बायका न आवरता बाहेर पडताच नाहीत हे सत्य आहे...बाई ला घ्यायला यमराज आले आणि बाई नी आवरलं नसेल तर किस्सा कसा असेल..
यमराज- चल मी तुला घ्यायला आलोय...
बाई- अहो जरा वेळ वेळ आहे का? २नच मिनीट? मी जरा आवरून येते मग आपण जाऊ...
यमराज- ठीक आहे...तुझी शेवटची इछा मी पूर्ण करतो.
बाई- आलेच बघा २ मिनटात....
यमराज बाईची वाट पाहत बसतो..२ मिनीट होतात....१० मिनीट होतात पण बाई यायचा पत्ता नाही.
तो तिला विचारतो..अजून किती वेळ लागेल बाई? बाईच उत्तर ठरलेलं फक्त २ मिनीट..(बायका आवरायला २ मिनीट पेक्षा जास्ती वेळ कधीच घेत नाहीत..hehe) अस खूप वेळा होतं ...पण यमराज स्वत म्हणलेलं असतो तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो म्हणून तो काही बोलू शकत नसतो. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो.
शेवटी यमराज कंटाळून म्हणतो...बाई तुमचा नट्टापट्टा चालू राहू द्या..मी नंतर कधीतरी येतो.
तात्पर्य- बाईच्या आवण्याच्या मधे कुणीही येऊ शकत नाही.