*सुंदर कथा *

💰🧫 *एक किलो लोणी* 🧫💰

*एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला.*
*दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला. दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता.*
*काही दिवस असेच चालू राहिले. एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो आणि लोणी 900 ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही. शेतकरी फसवणूक करत आहे असा विचार त्याच्या मनात आला.*

*दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाल तू मला धोका देत आहेत.*
*शेतकरी म्हणाला अहो भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही. तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती, त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो.*
> शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली, कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता. त्याच्या लक्षात आले की, *आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते*.
कथेची शिकवण
या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की, *आपण चुकीचे काम केल्यास आपल्या त्याचे फळही तसेच मिळते. यामुळे जैसी करनी, वैसी भरनी.*

Marathi Thought by Hari alhat : 111708275

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now