देवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालने जर आजच्या पिढीला अन्नाचा नास वाटत असेल तर त्यांनी आधी स्वतःला दोन कानशिलात भडकावली पाहिजे. मान्य आहे की देव कधीच मला अस करा तसच करा म्हणत नाही त्याची मनोभावे पूजा आणि जप नाम कारणच त्याला पुरे असत. पण जर २ किलोचा केक एकमेकांच्या थोबडाला फासन अन्नाची नासाडी नाही तर पिंडीवर केलेला अभिषेक नासाडी कसा ? जस अभिषेक केलेलं दूध जर कोणा गरीबाच्या पोटात गेले तर ते पाहून देवास आनंद होईल त्याच प्रमाणे जर २ किलो पैकी दीड किलो केक फासला जातो तो गरीबाच्या पोटात गेले ला पाहून सुद्धा देवाला आनंदच होणार आहे. ज्या बाबांनी अखंड आयुष्य भिक्षा मागून व्यथित केलं त्यांना तुमच्या सोन्याच्या चाद्ररीची, झुंबराची, सोन्याच्या कळसची, पादुकांची गरज असेल अस वाटत का ? असो शेवटी मॉर्डन आणि स्कॉलर गोष्टी समोर लोकांची विचार करायची पद्धत बदलत आहे अजून काय.