कसं आहे आज काल लोकांची विचार करायची पद्धत बदलत आहे. लोक जागृत होत आहे पण थोड्या दिवसांसाठी मग तो विषय कोणता पण असुदेत. उरी वर झालेला हल्ला असो की निर्भया प्रकरण किवा म आत्तचाच दक्षिण भारतातील त्या गरोदर हत्तीनीचा खूप ट्रेण्ड झाले हे विषय पण त्या मर्यादित काळापुरते पण आत्ता कोणाला विचारल ना तर काहींना ते आठवत पण नाही मग अश्या ट्रेण्ड जागरूक नागरिक असण्याचा फायदा होतो का? ट्रेण्ड करून किंवा ते २४ तासांसाठी पोस्ट करून फायदा नाही त्या साठी आपण स्वतः काय केलं हे गरजेचं आहे. ट्रेंड न करता समाजात खूप समस्या आहेत ज्या सोडवण खूप आणि अत्यंत गरजेचे आहे. आजच्या जागरूक नागरिकांना कळणे कठीण आहे.