मित्र, मैत्रिणी खूप होतात ह्या आयुष्याच्या वाटेवर त्यांच्या सोबत वेळ हा घरच्यांन पेक्षा जास्त व्यतीत होतो. मौजमजा, हिंडण, फिरन, पार्ट्या आणि बरच काही. पण जेव्हा वेळ येते ना मदत करण्याची तेव्हा ह्या हजार जणांपैकी फक्त एक-दोन जन मदतीला येतात ओ आणि अश्या वेळी आपण किती रंग बदलू व्यक्तींच्या सहवासात होतो ह्याचा अनुभव येतो. निव्वळ स्वार्थी आणि स्वतःची पाठ राखणारे असतात शंभर पैकी नव्व्यानवजन पण आपल्याला ओळखता यायला हवं की तो एक कोण ते.