प्रेमाचं नातं हे आपुलकी, काळजी आणि विश्वास या ३ बंधांनी घट्ट विनले गेलेले असते. यातील काही बंध सैल झालेले असतील तर संवादाच्या मार्गाने आपण ते पुन्हा घट्ट करू शकतो.
पण यातील एकहि धागा तुटला असेल तर या नात्यापासून दूर गेलेले केव्हाही चांगले असते. तुटलेल्या धाग्यांनी ठिगळ लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्या नात्याच्या सुंदरते पेक्षा ठिगळ जास्त उठून दिसू शकते.